रोज भवताली घडणाऱ्या गोष्टी काही वेळा आपले सगळे positive विचार बाजूला सारतात. आपण किती ठरवले कि चांगले विचार मनात आणायचे तरी दुखी आणि त्रास देणाऱ्या गोष्टींना गव्हातल्या खड्या प्रमाणे बाजू सारणे सोपे नसते. किती तरी कोडी अशी असतातत ज्यांची उकल सापडत नाही. आणि त्यात सोशल मिडिया वर येणारे “quotes” भर पडतात. प्रश्न फक्त मलाच पडतात असे नाही अनेकांना पडत असणार पण प्रत्येकाची विचार करायची आणि त्यातून बाहेर पडायची पद्धत वेगळी असते. शेवटी सगळ्यांना सगळेच जमते असे नाही.
एक वाक्य आहे,
“Life is not fair“.
आयुष्यात सगळी कडे “logic” दिसत नाही. सगळी कडे ते “fuzzy” जास्त जाणवते. उपाय मात्र शून्य. तर या फझीनेसची उदाहरणं बघू…
- एकाच क्षणाला अनेक बाळ जन्माला येतात पण त्यांचे नशीब सारखे नसते. त्यांच्या ग्रहमाना बद्दल म्हणाल तर एकाच हॉस्पिटल मध्ये, किंवा एकाच कुटुंबात एकाच वेळी मुले जन्माला येतात पण त्यांना जे मिळते ते सारखे नसते. कां ?
- एका घरात सगळे कष्ट करणारे असतात. पांघरून बघून पाय पसरतात पण त्यांच्या चिंता कमीच होत नाही. आयुष्य आज सुधारेल उद्या सुधारेल ह्या आशेवर माणसे येतात आणि जगाचा निरोप घेतात. कां?
- काही जण “happy go lucky” असतात, ते फार मोठं किंवा वेगळं करण्याच्या फंदात पडत नाही पण त्यांना हवे ते, हवे तेंव्हा ताटात वाढल्या प्रमाणे मिळते. कां?
- काही जण स्वार्थ याच्या पली कडे जात नाही पण आयुष्य मजेत जगतात. त्या वागण्यामुळे इतरांना त्रास झालेला त्यांना कधीच कळत नाही. आणि आयुष्यात उलट प्रसंग हि कधी येत नाही तेंव्हा आपल्या बरोबर असे केले तर काय वाटते याचा काही अनुभव त्यांना येत नाही. कां?
- काही जण आयुष्यात नाटक करण्या पली कडे काही करत नाही पण त्यांचे कुठे हि अडत नाही. कां?
- देवावर श्रद्धा (अंधश्रद्धा नव्हे) असणारी माणसे खितपत पडलेली असतात आणि देवा वरच्या श्रद्धे चा बाजार मांडणारी किंवा ग्लोरिफिकेशन करणारी माणसे समाजात मोठ्या तोऱ्याने मिरवत असतात. कां? पेपरात आणि सोशल मिडिया वर अशी उदाहरणे हवी तेवढी सापडतील.
- आई-वडील आणि घरातील जेष्ठ यांचे करणारे चक्रव्यूत अडकलेले दिसतात आणि आई वडिलांची काळजी घेतो असे नाटक करणारे मजेत जगतात. कां?
- प्रत्येकाला कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी एक सारखा काळ आणि इतर पाठबळ मिळत नाही. कां?
- आयुष्यात मुंगीला न दुखवणारी माणसे मुंगी एवढ्या सुखा साठी तीळ तीळ जळतात. कां?
- जे सर्व सामान्य माणसांना मिळते तेवढे हि काही लोकांना मिळत नाही. कां?
- काही लोक आयुष्य कधीच ताठ मन करून जगू शकत नाही, तशी संधी त्यांना मिळत नाही. कां?
काळोख्या रात्री नंतर सूर्य प्रत्येकाच्या आयुष्यात कां उगवत नाही???
“Many people don’t deserve what they get and many people don’t get what they deserve“.
असे का होते? ” भगवान के घर देर है अंधेर नाही” हे आणि अशी वाक्ये सिनेमा, नाटक किंवा मनोरंजन किंवा “दिल बहलाव्या” साठी असतात का?
You must be logged in to post a comment.